भारताच्या सीमांबाबत बोलताना लष्कर प्रमुख म्हणाले की भारताने आपलं लक्ष पाकिस्तानबरोबरच्या सीमेवरून काढून चीनबरोबर च्या सीमेवर केंद्रीत केलं पाहीजे. चीनपासून भारताला भविष्यातला मोठा धोका आहे हेच लष्कर प्रमुखांना सुचवायचे होते.लष्कर प्रमुख जनरल बीपिन रावत यांच्या विधानातली खोच नेमके पणाने चीनच्या लक्षात आल्याने चीनचा तीळपापड झाला आहे. चीनच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांत भारत चीनमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र दोन्ही देशांनी द्विपक्षीय चर्चा आणि समन्वय वाढवत तो तणाव कमी केला होता. यात दोन्ही देशांच्या नेतृत्वाने महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र भारताच्या लष्कर प्रमुखांच्या या वक्तव्याने दोन्ही देशांच्या संबंधांना तडा जाऊ शकतो. यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांमधला पारदर्शकपणा कमी होऊ शकतो, असं चीनी प्रवक्त्याने म्हटलं आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews